|
भारतीय स्त्रीशक्तिची
अशी धारणा आहे
की महीला समस्यांचा
विचार फक्त
स्त्रीवादी
भूमिकेतून कएणे
पुरेसे नाही,
तर राष्ट्रवाद
व सामाजीक परिवर्तनाच्या
दृष्टिकोनातून
करणे आवश्यक
आहे. आपल्या
प्रश्र्नांची
उत्तरे शोधण्यासाठी
महीलांनी संघटित
व्हायला हवे.
त्याचबरोबर
राष्ट्रीय व
सामाजिक प्रश्र्नांबाबत
क्रियाशील व्हायला
हवे. महिलांच्या
सहभागाशिवाय
कोणतेही खरे
सामाजिक परिवर्तन
घडू शकत नाही.
राष्ट्रीय पुनर्निर्माणाच्या
प्रत्येक स्तरावर
निर्णय प्रक्रियेपासून
कार्यवाहीपर्यंत
स्त्रियांचा
सहभाग अपरिहार्य
आहे.
याच हेतूने
भारतीय स्त्रीशक्तिने
स्त्रीशिक्षण,
आरोग्य, आर्थिक
स्वावलंबनाच्या
योजना व विशेष
सुविधा, याबाबत
रचनात्मक, स्त्रियांचे
अधिकार व त्याबाबतचे
कायदे यासंबंधी
प्रबोधनाचे,
अन्याय अत्याचाराविरुद्ध
जनजागरणचे व
संघर्षाचे असे
विविध कार्यक्रम
व उपक्रम हाती
घेतले आहेत.
|